spot_img
spot_img
spot_img
spot_img

अंबानींच्या लग्नात फक्त २ मराठी कलाकारांना निमंत्रण, त्यांनीही पाठ फिरवली? चर्चांना उधाण!

अंबानी कुटुंबाच्या भव्य विवाह सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली, मात्र मराठी कलाकारांच्या उपस्थितीबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः श्रेयस तळपदे आणि अमृता खानविलकर यांना निमंत्रण मिळाल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते. श्रेयसने तर निमंत्रण पत्रिका शेअर करत “आता लग्नाला जावं लागेल” असे मजेशीर कॅप्शन दिले होते, तर अमृतानेही तिच्या निमंत्रण पत्रिकेचे फोटो शेअर केले होते.

तरीही, या शाही सोहळ्याचे जे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले, त्यापैकी कशामध्येही श्रेयस आणि अमृता दिसले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे, या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सोहळ्याचे कोणतेही फोटो किंवा अपडेट्स शेअर केलेले नाहीत.

सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती

यामुळे सोशल मीडियावर मराठी कलाकारांना निमंत्रण न मिळाल्याने, किंवा मिळालं असूनही ते गैरहजर राहिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका नेटकऱ्याने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, “शाही विवाह सोहळ्यात मराठी कलाकारांना निमंत्रण असूनही त्यांनी पाठ फिरवली, की ते पॅप्सच्या कॅमेऱ्यातून कसे सुटले हा प्रश्न नक्की पडतो… त्यामुळे नक्की काय घडलंय, या प्रश्नाचं उत्तर सध्या अनेकजण शोधत आहेत.”

या संपूर्ण प्रकारामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि अंबानींच्या सोहळ्यातील मराठी कलाकारांच्या उपस्थितीबद्दलचे गूढ अधिकच वाढले आहे.

Epaper Website

Related Articles

भोगवटाधारक स्वतः या खात्याचे वनमंत्री असल्याने कारवाईला विलंब, नागरिकात अधिकाऱ्याच्या कारवाई बाबत तीव्र नाराजी

नवी मुंबई / प्रतिनीधी महाराष्ट्र खाजगी वने अधिनियमातील तरतुदी नुसार वने विभागाची जमीन कवडीमोल भाड्याने दिलेल्या जमिनीची निःपक्षपाती चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी पत्रकार जनसेवक...

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिनानिमित्त पुण्यात ‘शक्ती’ प्रदर्शन!

पक्षात फूट पडल्यावर महायुतीत सहभागी होणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!