नवी मुंबई / प्रतिनीधी
महाराष्ट्र खाजगी वने अधिनियमातील तरतुदी नुसार वने विभागाची जमीन कवडीमोल भाड्याने दिलेल्या जमिनीची निःपक्षपाती चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी पत्रकार जनसेवक बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे
१) गट क्र. ४२६/व, २) गट क्र. ३९७/व, ३) गट क. ४२८/व, ४) गट क्र. ४२८/अ, ५) गट क्र. ४३०, ६) गट क्र. ४३१, ७) गट क्र. ४३३ या सर्व गट क्रमांकांना महाराष्ट्र खाजगी वने अधिनियमातील तरतुदीस अधिन असे ७/१२ वरती नमुद आहे. या सातबा-याचे भोगवटाधारक श्री. गणेशजी नाईक वनमंत्री आहेत तसेच
२) १) गट क्र. ४३१, २) गट क्र. ४७५अ, ३) गट क्र. ४३१ हे गट क्रमांक मे. सुबह अॅग्रो लिमिटेड यांना ६० वर्षासाठी कवडीमोलाने प्रती एकर ५०० रूपये भाडेपट्टयाने दिले आहे. या सर्व प्रकरणाची
नी पक्षपातीपणे चौकशी होणेसाठी वनमंत्री महोदय यांना ०८.१२.२०२५ रोजी व १३.०१.२०२६ मंत्रालय येथे पत्र दिले होते तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांना १३.०१.२०२६ रोजी निवेदन दिले होते तसेच या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी १३.१२.२०२५ रोजी उपवन संरक्षण ठाणे यांना कार्यवाही करण्याचे सुचविले.
त्यानंतर ०६.०२.२०२६ रोजी उपवन संरक्षण ठाणे यांना आम्ही याबाबत तक्रार दिली असुन यावरती अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही होत नाही कारण भोगवटाधारक स्वतः या खात्याचे वनमंत्री असल्याने कारवाईला विलंब होत असल्याची चिंता बाळासाहेब मिरजे यांनी व्यक्त केली आहे.




